Thursday, December 23, 2010

वेलांटी - एक माता- उदरात सांभाळते आणि दुसरी माती- मृत्युपश्चात कवेत घेते

परवा एका समारंभाच्या निमित्ताने लोकसत्ताचे सुधीर जोगळेकर यांची गाठभेट झाली. मराठीतल्या दोन साधम्र्यधारक शब्दांचा अर्थ विषद करताना सुधीर जोगळेकर म्हणाले, ‘माणसाचा प्रवास हा मातेकडून मातीकडे होतो. एक माता- उदरात सांभाळते आणि दुसरी माती- मृत्युपश्चात कवेत घेते. या दोन्ही शब्दांत फरक असतो तो फक्त एका वेलांटीचा. ही वेलांटी म्हणजे खरे तर आपलं आयुष्य असते.
पण वेलांटीची ही खोली आपल्याला उमगतच नाही. आपण बसतो, आयुष्यात उभ्या-आडव्या कोलांटय़ा घेत. आपल्याला ना मातेचे श्रम समजतात, ना मातीचे श्रेय उमजते! कळत-नकळत अनेकदा आपण या दोघांचा अनेकदा अपमान, उपमर्द आणि उपेक्षा करतो. पुष्कळशा प्रसंगात आपण त्यांना गृहीत धरतो. त्यांचे अस्तित्व हे जणू आपले असणेअधिक सुखकर व्हावे यासाठीच असल्यासारखे वागतो. आपल्यासाठी सुखकर्ता; दु:खहर्ताहोणाऱ्या या माता-मातीसाठी. आरती ओवाळणे तर दूरच, त्यांना चार कौतुकाचे शब्द वाहाण्यातही आपण करंटे ठरतो. वडिलांचा धाक वाटतो, आईचा आधार असतो. वडील काय म्हणतील, याची धास्ती असते; आई काही म्हणाली तरी शेवटी माझ्याच मनाप्रमाणे वागेल, हा दिलासा असतो. वडील ही अनाकलनीय कात्री, तर आई ही आश्वस्थ खात्री असते. व्यवहारात वडील सिकंदर असतीलही, पण घरातल्या प्रत्येक वादळात आई हीच भक्कम आधार असते. वडील एखादे वेळी फणसाचा गरा निघतील, पण आई ही नेहमीच करंजीतल्या खोबऱ्याचे सारण असते.
आणि अशा या आईवर आम्ही करवादतो, खेकसतो, तिला रडवितो आणि ती रडताना पाहिली की, आम्हीही रडतो. पण काही क्षणा-दिवसांनंतर पुन्हा पाढे पंचवीस. आईचे आणि आमचे अद्वैत असते, पण ते खऱ्या अर्थाने कळते तेव्हा ती खूप दूर निघून गेलेली असते. तेव्हा पाऊस निनादत नाही, तर आभाळालाही टाहो फोडावासा वाटतो. त्रलोक्याचे स्वामी असलेले आम्ही तेव्हा खऱ्या अर्थाने भिकारी होतो. आठवणींचे कढ येतात, गळा दाटून स्वर येतात, परत येत नाही ती आई. मग या आयुष्याच्या वेलांटीत कधी तरी स्वल्पविराम घेऊन आम्ही तिच्यासाठी कौतुकाची चार उद्गारवाचक चिन्हे काढायला नकोत का?
जी अवहेलना मातेची, तीच कहाणी मातीची. आमच्या डगमगणाऱ्या पावलांना ती स्थिर करते. लहानपणी आम्ही तिच्या उरावर किल्ले बांधतो, खडूने चौकटी आखून छापा-पाणी खेळतो, एक रेष आखून तळ्यातून-मळ्यात जातो, न ओलांडायच्या लक्ष्मणरेषांचीही तीच साक्षीदार असते. धरणे, जलाशये, बागा, इमारती साऱ्यांना ती आधारभूत ठरते. पण आमची हपापलेली वृत्ती आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आम्ही शे-दोनशे मीटरचे इमले तर तिच्या जिवावर उभे करतोच, पण तिच्याच अंतरंगात खोदकाम करून दोन-तीन मजले खोलवर बोगदे, स्टेशने आणि रेल्वे बांधतो. कारण आमच्या लेखी ती फक्त एक भूखंड असते. सात-बाराच्या उताऱ्यात ती बंदिस्त असते. खोदकाम केल्यावर कधी निर्मळ पाण्याचा झरा मिळतो. वास्तविक पाहता ते तिचे आमच्यावरचे नि:स्सीम, निर्मळ प्रेम असते. आम्ही मात्र याऐवजी तेल मिळाले असते तर किती बरे झाले असते, हा दांभिक, व्यवहारी विचार करतो. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही भूमी देणार नाही,’ म्हणताना आमच्या मनात तिच्याविषयी आदर नसतो, आमच्याबद्दल आग्रही दर्प असतो. तिचा ऊर फोडण्यासाठी आम्ही वेगवेगळी साधने बनवितो आणि कधी तिने नुसती कूस बदलून अंगडाई जरी घेतली तरी आमचे होत्याचे नव्हते होते. आमचा उभा जन्म आम्ही तिच्या उरावर उभे राहण्यात आणि उंची गाठण्यात घालवतो. आणि मृत्यू आल्यावर मात्र आडव्या अवस्थेत तिची खोली गाठतो. मातीशी आमचे खरे नाते काय असते ते कळायला आम्हाला मातीतच मिसळायला लागते आणि ती अवस्था प्राप्त झाल्यावर आमची मर्त्य नाती म्हणतात- त्याची माती झाली!
माता आणि माती या दोन्ही मातुल गृहांचे स्थान जेव्हा एकवटते, तेव्हा आपल्याला आपल्या राष्ट्रभूमीचे आणि आपले खरे नाते उमगते. हा देश मला केवळ नागरिकत्वच देत नाही, तर तोंडात घास, ओठात पाणी, श्वासात हवा आणि टेकायला निवारा देतो. अमर्याद, अथांग आसमानाची छत्री देतो आणि पथारी पसरायला काळीभोर सुजराम्-सुफलाम् माती-माय देतो. आयुष्याची वेलांटी काढताना कधीतरी थबकून या देशाच्या भूमीचे ऋण व्यक्त करणे, हे आपले परम कर्तव्य करावे. देशाचीही आपल्याकडून अवास्तव, अवाजवी अपेक्षा नाही. त्याने आजवर अनेक अराजके, अनागोंदी अन् आक्रमणे साहिली आहेत. परकीयांच्या हस्तक्षेपाला तो कधीच डगमगला नाही. स्वकीयांच्या लाथाळ्यांनी मात्र तो व्यथित होतो. त्याचे आपल्याकडे मागणे लई नाही. तो फक्त सदाचाराचा भुकेला आहे. त्याला सार्वभौमत्वाचा हव्यास नाही, साहचर्य आणि सौहार्दतेचा ध्यास आहे. भ्रष्टाचाऱ्याची भिंगरी कधी एकदा सुटेल अन् मातेकडून मातीकडे जाताना मानवाला त्याच्या मर्त्य जीवनाचा खरा अर्थ उमगेल या विवंचनेत तो आज उभा आहे- वाट पाहात!
खूप काही करण्याची जबाबदारी आता आपली आहे.

- डॉ. संजय ओक

Wednesday, August 12, 2009

वेळ आरोग्याबाबत जागरूक होण्याची

सध्या "स्वाइन फ्लू'ने खळबळ माजविली आहे. यापूर्वीही बर्ड-फ्लू, डेंगी, चिकन गुन्या अशा रोगांमुळे अशीच खळबळ माजली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे; परंतु अशी परिस्थिती उद्‌भवूच नये, यासाठी काय करता येईल, हे सध्याच्या पार्श्‍वभूमीवर पाहणे औचित्याचे ठरेल. योग्य आहार, व्यायाम, मैदानी खेळ व योगशास्त्र यांच्या माध्यमातून आपण वरील सर्व आजारांशी सर्वार्थाने सामना करू शकतो.
प्रदूषण, मनोविकार, चुकीचा आहार, व्यायामाबद्दल अनास्था व अभाव, जहा औषधे यांमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत दुर्बल होते. त्यातच भर म्हणजे रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी कमी असणे किंवा रक्तक्षय असणे. तसेच "व्ही ओटू मॅक्‍स' (त-ज२ चरु) म्हणजे प्राणवायूचे जास्तीत जास्त आकारमान वापरण्याची शरीराची क्षमता कमी असणे; अशा सर्व व्यक्तींना असे आजार होण्याची दाट शक्‍यता असते.
आता प्रश्‍न असा आहे, की जंतुजन्य विकारांच्या बाबतीत फक्त जंतूंचाच विचार करणे पुरेसे आहे का? याचे उत्तर आपल्या शरीरातील अंगभूत अशा रोगप्रतिकार यंत्रणेत दडलेले आहे. या यंत्रणेला "इम्यून सिस्टिम' म्हणतात. ती म्हणजे शरीरात सतत कार्यरत असलेला अत्यंत निष्णात असा डॉक्‍टरच आहे! कोणत्याही अस्वास्थ्याचा मागोवा घेऊन त्यावर परिणामकारक इलाज करणारा, शरीरांतर्गत संतुलन कायम राखणारा डॉक्‍टर.
आपण सर्वांनी सर्वार्थाने जर या डॉक्‍टरची किंवा सिस्टिमची काळजी घेतली, तर केवळ जंतूच नव्हे; तर जंतू वाढायला पोषक अशी परिस्थितीसुद्धा आपण आपल्या शरीरात निर्माण होऊ देणार नाही. "व्हायटल फोर्स हिल्स'ही आयुर्वेदातील व योगशास्त्रातील "स्वस्थवृत्त' संकल्पना म्हणजे या रोगप्रतिकार यंत्रणेची कार्यक्षमता टिकविण्याचे मार्गदर्शनच आहे. योगशास्त्रामध्ये जी योगासने सांगितली आहेत, त्यामुळे शरीरातील पेशींचे मंथन होऊन नको असलेली अशुद्ध द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम फारच प्रभावीपणे पार पाडले जाते. विविध तऱ्हेच्या आसनांमुळे श्‍वसन संस्था, अभिसरण संस्था व प्रतिकार यंत्रणा फारच कार्यक्षम होतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घातल्यास, शरीरामध्ये ड जीवनसत्त्व तयार होते, ज्याचा उपयोग आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम साठविण्यासाठी व पोचविण्यासाठी होतो.
तांबड्या व पांढऱ्या पेशी बनविण्यामध्ये आपली हाडे सतत व्यग्र असतात. यामुळेदेखील या यंत्रणेमध्ये संतुलन साधू शकते. सूर्यनमस्कार व योगासनांमुळेदेखील "व्ही ओटू मॅक्‍स' वाढू शकतो. प्राणायामामुळे छातीमध्ये प्राणशक्तीचे संचलन होऊन श्‍वसन संस्थेच्या साह्याने वातावरणातील वायुरूपशक्ती शरीरात येते व त्यामुळे उत्तम दमश्‍वास मिळतो. आपल्या शरीरातील ही रोगप्रतिकार यंत्रणा आपला दमश्‍वास, प्रतिकारशक्ती व स्टॅमिना यावर अवलंबून असते. याच प्राणशक्तीमुळे श्‍वसन शक्‍य होते आणि शरीरातील जोम किंवा ताकद यामुळेच वाढते. ही शक्ती जेव्हा निघून जाते, त्या वेळी आयुष्य संपते आणि ज्या वेळी कमी होते, त्या वेळी शरीरामध्ये अनेक आजारांचे व व्याधींचे संचलन चालू होते; तसेच मोकळ्या हवेत अथवा मैदानावर निरामय स्थितीत नियमाने व्यायाम केल्यास वजन आटोक्‍यात राहून शरीराची हालचाल करण्याकरिता लागणारी ऊर्जा जास्त खर्च न होता, या ऊर्जेचा उपयोग पर्यायाने रोगप्रतिकार यंत्रणेवर होणारच; कारण जास्त वजन म्हणजे जास्त ऊर्जा खर्च होणार. आठवड्यातून एकदा आपण सर्वांनीच "जलनेती' नावाची; तसेच भस्त्रिका, कपालभाती, या शुद्धिक्रिया करणे आवश्‍यक आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम, घशाचे विकार व जंतूंपासून होणाऱ्या अनेक विकारांवर या शुद्धक्रियांचा वापर प्रभावी ठरतो. भरपूर पाणी पिणे, गरम दुधात हळद घालून घेणे, हिरव्या ताज्या पालेभाज्या खाणे, फक्त सिझनल त्या-त्या ऋतूंमध्ये मिळणारीच फळे खाणे, गर्द हिरव्या व लाल-पिवळ्या भाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते, ते अत्यंत प्रभावी अँटिऑक्‍सिडंटचे काम करते- रखवालदारासारखे. जंतूंसाठी लसूणदेखील असाच पॉवर हाऊस, कलिंगड, स्ट्रॉबेरी, कोबी, फ्लॉवर व मुळा; तसेच शिरांच्या भाज्या, कांद्यामध्ये असलेले क्वरसेटिन हे अँटऑक्‍सिडंट, पिस्ते-आक्रोड व तीळ यात असलेले हे सगळे पदार्थ आलटून-पालटून रोजच्या खाण्यात ठेवणे महत्त्वाचे आहे. दही हादेखील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ. कांदा, सोयाबीन, कडधान्ये, सबंध धान्य, लिंबू व संत्रे, ई जीवनसत्त्वासाठी मारगारीन, गोड बटाटे, गाजर (बिटा कॅरोटिनसाठी), लोहासाठी तीळ; अशा पदार्थामुळे रोगप्रतिकारपुष्टी मिळते व ती यंत्रणा कार्यक्षम होऊन पुष्टिवर्धक बनू शकते. अशी दक्षता प्रथमपासूनच घेतली तर वरील सर्व आजारांशी आपण समर्थपणे सामना करू शकतो व त्यांना दूर ठेवू शकतो.
-डॉ. नितीन उनकुले

Wednesday, July 01, 2009

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)





Code:
General
Complete name : Mi.Shivaji.Raje.Bhosale.Boltoy.2009.1CD.Pre-DVDRip.XviD.By.TeaM.RapidStarZ\Mi.Shivaji.Raje.Bho sale.Boltoy.2009.1CD.Pre-DVDRip.XviD.By.TeaM.RapidStarZ.avi
Format : AVI
Format/Info : Audio Video Interleave
File size : 586 MiB
Duration : 2h 22mn
Overall bit rate : 574 Kbps

Video
Format : MPEG-4 Visual
Format profile : Streaming Video@L1
Format settings, BVOP : Yes
Format settings, QPel : No
Format settings, GMC : No warppoints
Format settings, Matrix : Custom
Codec ID : XVID
Codec ID/Hint : XviD
Duration : 2h 22mn
Bit rate : 498 Kbps
Width : 608 pixels
Height : 352 pixels
Display aspect ratio : 16/9
Frame rate : 29.970 fps
Resolution : 24 bits
Colorimetry : 4:2:0
Scan type : Progressive
Bits/(Pixel*Frame) : 0.078
Stream size : 508 MiB (87%)
Writing library : XviD 1.2.1 (UTC 2008-12-04)

Audio
Format : MPEG Audio
Format version : Version 1
Format profile : Layer 2
Codec ID : 50
Codec ID/Hint : MP1
Duration : 2h 22mn
Bit rate mode : Constant
Bit rate : 64.0 Kbps
Channel(s) : 2 channels
Sampling rate : 48.0 KHz
Resolution : 16 bits
Stream size : 65.3 MiB (11%)
Alignment : Split accross interleaves
Interleave, duration : 33 ms (1.00 video frame)
Interleave, preload duration : 500 ms









Download Fast

http://hotfile.com/dl/7852327/892647...R.avi.001.html
http://hotfile.com/dl/7852346/a8e60a...R.avi.002.html
http://hotfile.com/dl/7852374/d96ada...R.avi.003.html



http://www.megaupload.com/?d=XZTKI502
http://www.megaupload.com/?d=ZQHB3CKQ
http://www.megaupload.com/?d=6Y0F6MTQ



http://www.sendspace.com/file/ftz9u3
http://www.sendspace.com/file/5dl03o
http://www.sendspace.com/file/bgh3jy



http://rapidshare.com/files/25063103...FatheR.avi.001
http://rapidshare.com/files/25063104...FatheR.avi.002
http://rapidshare.com/files/25063095...FatheR.avi.003



http://rapidshare.com/files/25056848...XviD.part1.rar
http://rapidshare.com/files/25057291...XviD.part2.rar
http://rapidshare.com/files/25057811...XviD.part3.rar
http://rapidshare.com/files/25058591...XviD.part4.rar
http://rapidshare.com/files/25059068...XviD.part5.rar
http://rapidshare.com/files/25059494...XviD.part6.rar
Password :
www.warez-bb.org


http://rapidshare.com/files/25070729...FatheR.avi.001
http://rapidshare.com/files/25071006...FatheR.avi.002
http://rapidshare.com/files/25071050...FatheR.avi.003



http://rapidshare.com/files/25050657...dStarZ.avi.001
http://rapidshare.com/files/25050743...dStarZ.avi.002
http://rapidshare.com/files/25050665...dStarZ.avi.003


http://www.megaupload.com/?d=QWZ02C7Q
http://www.megaupload.com/?d=DXYF7MCL
http://www.megaupload.com/?d=39MMD2AR


चित्रपट आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Sunday, June 21, 2009

तो चिमुकला चेहरा

सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा.

पाचवी-सातवीत असतानाचा किस्सा. दोन रुपयांच्या दोन करकरीत नोटा कपाटातून 'उचलल्या' होत्या. चॉकलेटसाठी अशी उचलेगिरी बहुतेक वेळा ठरलेली. आईची नजर चुकवून घराबाहेर पडलो आणि 'ती' दिसली... चाळीच्या गेटवर कपड्यांच्या लक्तरात गुंडाळून बसलेली, कडेवर शेंबडं पोर. नजरेत व्याकूळ भाव. हात पुढे न करताही काहीतरी मागणारे. ती नजर चुकवून पुढे आलो. अशांना बाबा कधीतरी पैसे काढून द्यायचे ते आठवलं.

वाण्याकडे आलो. चार रुपयांचं 'डेअरी मिल्क' घेतलं आणि निघालो. थोडं पुढे जाताच पाय थांबले. गेटवर 'ती' असली तर? तिच्यासमोर चॉकलेट खात जाणं बरं दिसणार नाही. खिशातलं चॉकलेट बाहेर काढलं. खावंसं मात्र वाटेना. 'ती'चा चेहरा दिसत होता... गलबलून आलं. वाण्याकडे परतलो. डेअरी मिल्क परत करून साधी चॉकलेटं आणि दुसरी नोट परत घेतली. गेटवर ती होतीच. निमूट खिशातली नोट तिला दिली. व्याकूळ नजर हसली. मलाही बरं वाटलं...

' भिकारी' या व्यक्तीशी माझी पहिली 'वन टू वन' ओळख ही अशी... चोरलेले का असेनात, त्या भिकारणीला आपण पैसे दिले याच्या कौतुकाने कितीतरी दिवस हुळहुळत होतो... शाळेत जाता-येताना, आईबाबांबरोबर बाहेर जाताना, रस्त्यावर दिसणाऱ्या 'त्यांच्या'कडे बघणं मी टाळत नसे. फूटपाथवर, रस्त्यांवर झोपलेले हे भिकारी पावसाळ्यात काय करत असतील? भीक मिळाली नाही, तर काय खात असतील, अशा प्रश्नांचं काहूर माजे. बऱ्याच वेळा बाबांना सांगून मी त्यांना भीक द्यायला लावी. कधी माझ्या खिशातूनही चार-आठ आणे 'त्यां'च्या वाडग्यात पडत.

शाळा संपून कॉलेजलाइफ सुरू झालं, तरी भिकाऱ्यांबाबतचा कळवळा होता. चार आण्यांची जागा रुपया-दोन रुपयांनी घेतली. भीक देताना मात्र 'वगीर्करण' सुरू झालं. पहिला प्रेफरन्स म्हाताऱ्यांना, नंतर लुळ्यापांगळ्यांना आणि शेवटी 'देवाघरची फुले' असणाऱ्या मुलांना. धडधाकट भिकारी लिस्टमधून कधीच कट झाले होते!

नोकरी लागल्यानंतरही बदल झाला नाही. उलट भीक देण्यासाठी आता हक्काचे पैसे होते. स्टेशनात ज्यूस पिताना, वडापाव खाताना सामोर हात पसरून उभे राहणाऱ्या पोरांना, चायनीज गाड्यांभोवती उरलंसुरलं गोळा करत फिरणाऱ्यांना सहसा निराश करत नसे.
काही महिन्यांपूर्वी गोरेगावला शिफ्ट झालो. भिकाऱ्यांचं नवंच विश्व पाहत होतो. घर ते रेल्वे स्टेशनपर्यंत दोन सिग्नल शिवाय स्टेशनचा लास्ट स्टॉप. 'त्यां'ची व्हरायटीच पाहायला मिळायची. मुलं, 'बॅकअप'ला त्यांचे पालक... 'मालक' म्हणा हवं तर, म्हातारे हवे असतील तर तेही आणि हो, छक्क्यांची गँगही. भीक मागताना बिनदिक्कत स्पर्श करणारे. भसाड्या आवाजात 'बाबू... राजू' करत हक्क असल्याप्रमाणे पैसे मागणारे. नाही दिले तर अगम्य भाषेत शिव्याशाप देणारे. रोज तेच तेच 'धंद्यावर' बसलेले भिकारी... सगळ्याचा उबग येत गेला. भीक मागायला पुढे सरसावलेल्यांकडे तुच्छतेने बघणं, न बघणं जमू लागलं... हळूहळू 'कोरडा' होऊ लागलो होतो.

दिवाळीच्या आधीचा प्रसंग...

ऑफिसला जातानाची नेहमीची घाईगडबड. घरातून निघताना झालेला उशीर. पाचवीला पूजल्याप्रमाणे बस लेट. मग रिक्शा केली. डोक्यात राग होताच सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा. 'साहेबा'ला नाराज केल्याची बोच. 'धंदेवाईक'पणा अजिबात नाही. माझी नजर खाली गेली पण खिशात हात गेला नाही. सिग्नल सुटला आणि त्या मुलीचा संबंधही...

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती रविवारची. पण झोपेत 'ती'चा चेहरा आठवला. तो दिवस अस्वस्थेत गेला. जेवताना, टीवीवरचे कार्यक्रम बघताना, कॉलनीत खेळणाऱ्या मुलांशी बोलताना ती बोच कायम होती. 'कोरडं' मन ओलावू लागलं होतं.

दुसऱ्या दिवशी मुद्दाम रिक्शा केली. सिग्नलपाशी ती नव्हती. तिसऱ्या दिवशीही तेच. चौथ्या दिवशीही नव्हती. रिक्शा सोडली. सिग्नलजवळच्या पेपरवाल्याकडे सहज चौकशी केली. त्यालाही ती मुलगी माहीत असण्याचं कारण नव्हतं. 'परवा तो राडा झाला ना साहेब, त्यानंतर इकडचे बरेच भिकारी कमी झाले. बहुतेक गेले असतील यूपी-बिहारला परत,'... पेपरवाला सहज म्हणाला.

शरमेची जागा अपराधीपणाने घेतली.... 'तो' चेहरा आणखी छळणार होता... निदान काही दिवस...

मन पुन्हा 'कोरडं' होईपर्यंत.

मुंबई शहरं आणि माणसं

सकाळचे आठ. ठिकाण दादर रेल्वेस्टेशन. खटडक् खटडक् खटडक् आवाजात लोकलचा प्रवेश. शेकडोंची गर्दी. उतरणाऱ्यांची, चढणाऱ्यांची घाई. मग एकामेकांना खुन्नस. यात कसा बसा मी चढलो. जागा भेटली. लोकल सुरू. डब्यात कित्येक जण उभे. जागा कमी-माणसं जास्त. काही उभ्यानेच डुलक्या घेतायत, कुणी उरलेला अभ्यास करतोय, कुणी कादंबरी वाचतोय तर कुणी तंबाखू चोळतोय. गेल्या दोन महिन्यात कित्येकांना अशा उरलेल्या गोष्टी अगदी उरलेल्या आयुष्यासकट संपवतांना पाहातोय.

संध्याकाळ... दिवस बरा गेला. ऑफिसातून बाहेर पडून सीएसटी स्टेशनवर आलोय. लोकलमधे जाऊन बसलो. भरपूर जागा, माणसं कमी. पण, काही वेळातच चित्र बदललं. पुन्हा तेच. जागा कमी, माणसं जास्त. लोकल सुरू. उभ्या असलेल्या माणसांना बाजूला करत एक भिकारी समोर आलाय. पिकलेले केस. जाडजूड चेहरा. हसताना तोंडातले दोन-चार दात साथ सोडून गेल्याचे दिसताहेत. उभं राहता येईल एवढी जागा त्याने तयार केलीय. गळ्यात अडकवलेल्या ढोलवर सराईतपणे थाप मारून चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून तो गातोय. मधेच थांबून, 'दिल बोला तो देनेका, नहीं तो इष्टाइल में रहेनेका!' हे त्याचं वाक्य सगळ्यांना आकर्षून घेत आहे. काही क्षणातच त्याच्या कटोरीत नाण्यांचा आवाज यायला लागलाय. तो खुश. त्याने हसून सगळ्यांना धन्यवाद दिलाय. माझं स्टेशन आलं. उतरलो...

दुसरा दिवस. ठिकाण दादर स्टेशन. पुन्हा गर्दी. चढणारे-उतरणारे. कसा बसा चढलो. शर्टाचं बटन तुटलं. खांद्याजवळ थोडंसं घासलंही गेलं. बसायला जागा नाही. आज माझ्यासकट माणसं खूप-जागा कमी. पाच फुटाच्या दरवाज्यात जवळपास बारा माणसं लटकून उभी! घामाचा वास, गमीर् यात कसंसं व्हायला लागलंय. ऑॅफिसात पोहोचलोय. अचानक कळलं आज कशाची तरी सुट्टी. मग दिवसभर फिरायचं ठरवतोय.

संध्याकाळी दादर चौपाटीवर बांधलेल्या कठड्यावर गेलो. अंगावर लाटांचे तुषार उडत होते. समोर एक माणूस उभा होता. आजूबाजूला त्या व्यक्तीशिवाय कुणीच नव्हतं. निळ्या रंगाची कॅप, अंगात जीर्ण शर्ट, पॅण्ट मुडपून गुडघ्यापर्यंत आणलेली. नुकतीच ओहोटी झालेली होती. काही वेळाने ती व्यक्ती खाली उतरली आणि किनाऱ्यावर तरंगणाऱ्या कॅरिबॅग्ज गोळा करणं सुरू केलं. मग तिने त्या कॅरिबॅग फोडायला सुरुवात केली. त्यातून फुलं, अगरबत्त्या, इतर पूजेचं सामान आणि राख खाली पडायला लागली. त्या व्यक्तीची बोटं जलद गतीने त्या बॅग्जमधल्या राखेमधे घुसत होती. त्याला काहीतरी सापडत होतं. पटापट तो त्या वस्तू खिशात कोंबवत होता. सगळ्या कॅरिबॅग संपल्यानंतर तो रस्त्याच्या दिशेने चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. प्रेताला अग्नी दिल्यावर त्या प्रेताची राख समुदात सोडलेल्या नातेवाईकांना माहीत असेल का हे सारं? कसं हे भयानक आणि अंतर्मुख करणारं. कोण होती ती व्यक्ती? केव्हापासून करत असेल तो हे सारं? उपजीविकेचा धंदा असेल का तो? स्वत:च्या जगण्यासाठी कुणाच्या तरी मृत्यूची वाट पाहणं, किती भयंकर आहे. गुजरातमधील कांडला बंदर चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उध्वस्त झालं होतं. सरकारने मदत जाहीर केली. मृत मजुरांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये देण्याचं ठरलं. गावाकडचे नातेवाईक कांडलाकडे रवाना झाले. आपल्या मृत व्यक्तीला घेऊन जायला आलेल्या काही नातेवाईकांना मात्र प्रेतं भेटलीच नाहीत. मग प्रेतांचा शोध सुरू, मग, माहिती मिळाली, की रात्रीतून आम्हीच या प्रेताचे नातेवाईक, असं सांगून प्रेतं विकण्याचा धंदा करण्यात आला होता. किती हे दुदैर्व त्या मृत मजुरांचं? जिवंत असतांना तोकड्या रुपयांवर काम करणाऱ्या त्या मजुरांची मेल्यानंतर किती किंमत वाढली होती.

वाढत जाणारी शहरं आणि माणसं. कुणालाच कुणाचं सोयरसुतक नाही. आधुनिकता लादणारं हे युग. मुंबईसारखं शहर वाढणारं... अन् वाढवणारं. या शहरात माणसाची कमी नाहीच फक्त संवेदनशील मनांची कमतरता आहे. स्टेशनसमोर भीक मागणारा तो वृद्ध, रस्त्याने जाणाऱ्या चकचकीत गाड्या, थांबून राहणारं ट्रॅफिक, त्याच ट्रॅफिकमधे अडकलेल्या अॅम्ब्युलन्स, शाळेत मुलांना सोडायला आणि घ्यायला जाणारे पालक, या मॉड शहरात अंगावर चाबूक मारून घेणारे पोतराज, पोटात अन्नाचा कण नसतानाही टाय लावून फिरणारे बँकांचे प्रतिनिधी, पुलाखाली बसून नशा करणारे गर्दुल्ले, शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमागे गोंडा घालणारे उच्चभ्रू, असंख्य लोकाना घेऊन फिरणाऱ्या लोकल्स, पंचतारांकित हॉटेल्समधल्या श्रीमंतांच्या पार्ट्या तर कुठे शेकडो झोपडपट्ट्यांचं उध्वस्त जिणं. हे सारंच सुरू आहे. ठरल्याप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे...

शहर इतकंही छोटं नको, की प्रत्येकाला प्रत्येकाचं जिणं माहीत होईल आणि इतकंही मोठं नको, की ज्यातून वैयक्तिक ओळखच हरवून जाईल, हे तत्त्वचिंतक अॅरिस्टॉटल यांचं वाक्य मुंबईच्या गंभीर परिस्थितीला समजून घेण्यासाठी पुरेसं आहे, असं वाटतंय. या वेळी मात्र शेकडो प्रश्न उभे राहतात, दलितांना आरक्षण नको म्हणताना दुसरीकडे दलित स्त्रियांची अब्रू लुटण्याचं कमी झालंय? त्यांच्या वरचे अत्याचार कमी झालेत का? गांधीजींच्या देशात अल्पसंख्य ख्रिश्चनांना मारणारे, त्यांची घरंदारं उध्वस्त करणारे आले कुठून? इथे माणूस मरताना दिसत नाही! किती दिवस चालायचं हे सगळं? हातावर जगणाऱ्यांचं काय? चैत्यभूमीवर राख चिवडणारी ती व्यक्ती कशी जगत असेल? अण्णाभाऊ साठेंच्या कथेतला प्रेतं उकरणारा भिमा अन् या आधुनिक मुंबईतला राख चिवडणारी ती व्यक्ती, हे चक्र असंच सुरू राहणार का? श्रीमंत हा श्रीमंतच होत जाणार अन् गरीब गरीबच का? अजूनही नोकरीची वाट पाहणारे मिल कामगार? हे सगळं किती विचार करायला लावणारं आहे, पण हे राज्यकर्ते काय करताहेत? कितीही अवघड परिस्थिती आली, तरी त्यांनाच पुन्हा निवडून का दिलं जातं? पैशासाठी, बाटलीसाठी की जातीसाठी? काहीच कळत नाही. नेमकं कुणाला द्यावं हे जग चालवायला? 'उस आदमी को सौप दूँ दुनिया का कारोबार, जिस आदमींके दिल मे कोई आरजू ना हो,' या ताहीरच्या ओळींचं महत्त्व आता खरं वाटायला लागलंय. पण असा माणूस आणायचा कुठून?

तिसरा दिवस. लवकर उठलोय. आवरलंय. बाहेर आलोय. रस्त्यावरच्या बिहारीकडून चहा प्यायलो. स्टेशनमधे आलो. थोड्याच वेळात लोकलचा प्रवेश. रेल्वे सुरू. खटडक् खटडक् खटडक्...


About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed